उद्योगमंत्री सुभाष देसाईंची चिकलठाणा कचरा प्रक्रिया केंद्राला अचानक भेट, २५ वर्षा नंतरची तयारी आत्ताच करून ठेवण्याच्या सूचना

Foto

औरंगाबाद- मनपाच्या वतीने  उभारणी करण्यात येणाऱ्या चिकलठाणा परिसरातील  कचरा प्रक्रिया  प्रकल्पाला  उद्योगमंत्री  सुभाष देसाई  यांनी  शनिवारी दि.   अचानक भेट दिली. यावेळी त्यांना प्रकल्पाबाबत माहिती देताना अधिकाऱ्यांनी पुढील २५ वर्ष या प्रकल्पामध्ये यशस्वीपणे कचरा प्रक्रिया  करण्यात  येणार असल्याचे सांगताच  २५ वर्षांनंतरची तयारी आत्ताच करण्याच्या सूचना देसाई यांनी पदाधिकारी व अधिकाऱ्यांना केल्या.

काही महिन्यांपूर्वी शहरात मोठ्या प्रमाणावर कचरा कोंडी झाल्याने मनपाच्या वतीने चिकलठाणासह इतर ठिकाणी कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे काम सुरू करण्यात आले होते. शनिवारी शहरातील विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने  उद्योगमंत्री देसाई हे  शहरात आले होते. यावेळी  अचानक त्यांनी  चिकलठाणा येथील कचरा प्रक्रिया केंद्राला  भेट देण्याचे  निश्चित केले . महापौर नंदकुमार घोडेले यांना देखील काही मिनिटांपूर्वीच  याची कल्पना मिळाली. त्यानंतर लगेच महापौर नंदकुमार घोडेले, स्थायी समिती सभापती रेणूकदास वैद्य, सभागृह नेता विकास जैन, घनकचरा व्यवस्थापन प्रमुख नंदकिशोर भोंबे, कार्यकारी अभियंता एम.बी.काझी आदी कचरा प्रक्रिया प्रकल्प  स्थळी  उपस्थित झाले. देसाई यांनी कचरा प्रक्रिया केंद्राबद्दल सविस्तर माहिती घेतली. महापौर घोडेले व अधिकाऱ्यांनी य त्यांना प्रकल्पसंदर्भात माहिती दिली. 

देसाई यांनी मनपाच्या  या कामाचे  कौतुक करत  समाधान व्यक्त केले. १८ एकर एकूण जागेवरील १२ एकर जागेत दिडशे टन क्षमतेचा  उभा राहिलेला हा प्रकल्पात पुढील पंचवीस वर्षे यशस्वीपणे कचरा प्रक्रिया केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगताच पंचवीस वर्षा नंतरची तयारी आतापासूनच करण्याच्या सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना करीत  हा प्रकल्प  राज्यातील आदर्श असा प्रकल्प होईल असा विश्वास  यावेळी व्यक्त केला. 

देसाई यांनी काढले प्रकल्पाचे छायाचित्र 
प्रकल्पाच्या कामाबाबत समाधान व्यक्त करताना देसाई यांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात या कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे छायाचित्र टिपले. 

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker